🔴 पावसामुळे गोरगरिबांच्या घराची झालेली नुकसान भरपाई शासनाने त्वरीत द्यावे असे तहसीलदार यांना निवेदन.
शिवगर्जना न्यूज,
जिल्हा प्रतिनिधी : निळकंठ पाटील जाधव
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मागील आठवड्यातील सततच्या सतत धार पावसामुळे मोजे मोकासदरा या गावासह तालुक्यातील इतर बऱ्याच गावांमध्ये जुन्या मातीच्या राहत्या घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असल्यामुळे संसार उघड्यावर पडलेल्या घरांचे पंचनामे करून त्यांना सानुग्रह अनुदान मिळावे असे निवेदन समाजवादी पार्टीचे नांदेड युवा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) विठ्ठल मारुती पाटील गवळी यांनी तहसीलदार धमक्रीया गायकवाड यांच्याशी तात्काळ साधला संवाद मुक्त विषयी बांधीत झालेल्या कुटुंबामार्फत आपल्या सेवेत विनंती पूर्वक निवेदन सादर केले. मागील आठवड्यात आपल्या तालुक्यात सततच्या संततधार पावसामुळे मोकासदरा या गावासह तालुक्यातील बऱ्याच गावांमधील जुने दगड मातीचे राहते घर घराची पडझड झाल्यामुळे त्या कुटुंबातील संसार उघड्यावर पडलेले पडलेला आहे. आपस्तरावरून आदेशीत करून तसे संबंधित कर्मचारी तलाठी मंडळ अधिकारी यांना जाय मोक्यावर पाहणी व चौकशी करण्याचे आदेश समाजवादी पार्टीचे विठ्ठल पाटील गवळी यांनी केले आव्हान पडझड घराचे पंचनामे करून बांधीत कुटुंबियांना शासनाच्या विशेष निधी मधून सानुग्रह अनुदान मिळून द्यावे असे तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांच्याकडे दिलेले निवेदन गणपत कांबळे, दत्ता कांबळे, श्रावण कांबळे, पवार. मनोहर बैलके. प्रल्हाद शिळे, विनोद भाले, प्रदीप झुंजारे.श, पत्रकार अजीम, पत्रकार निळकंठ पाटील जाधव मुक्कासदरा येथील मोठ्या संख्येने नागरिक हे उपस्थित होते.
२०२२ पर्यंत गोरगरिबांची घरे पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार कट्टीबद्ध होते पण ते अपयशी ठरले आहे. आणि जी अस्तित्वात असलेली गोरगरिबांची घरे अति पावसाने नेस्तानुबत झाली असल्याने शासनाने त्यांना अनुदान द्यावे ही निवेदनकर्त्याची प्रामुख्याने मागणी आहे.