
🔴 नांदेड जिल्ह्यात श्रीगणेश उत्सव व ईद-ए-मिलाद शांततेत साजरे करा —- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत.
शिवगर्जना न्यूज,
नांदेड प्रतिनिधी : निळकंठ जाधव
नांदेड दि. ५ सप्टेंबर जिल्ह्यातील श्रीगणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद शांततेत साजरे करा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत शांतता समितीची नियोजन भवन बैठक : उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन एक गाव एक गणपती संकल्पना, ध्वनी प्रदूषण मुक्त उत्सव राबविण्यावर भर द्यावे.
नांदेड दि. ५ सप्टेंबर श्रीगणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण यावर्षी एकाच कालावधीत आले आहेत. जिल्ह्यात हे दोन्ही सण साजरे करतांना सर्व धर्मीयांनी परस्पर सौहार्द व शांततेला गालबोट लागणार नाही याची काळजी घेऊन एकोप्याने व आनंदाने सण साजरे करावेत, असे आवाहन.. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आज शांतता समितीच्या बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यासह शांतता समितीचे सदस्य व इतर सदस्यांची उपस्थिती होती.
सोशल मिडियाच्या अफवांना दुर्लक्ष करा. जिल्ह्यात श्रीगणेश उत्सव व ईद ए मिलाद या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सोशल माध्यमावरील संदेशामुळे जिल्ह्यात शांततेचा भंग होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी. याबाबत अगोदर सोशल माध्यमावरील संदेशाची सत्यता तपासून मगच प्रतिक्रिया द्यावी. कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता प्रत्येक नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
मागीलवर्षी च्या व्हिडिओ मुळे, संदेशा मुळे किंवा पोस्ट मुळे आपल्या आजूबाजूंच्या लोकांमध्ये अफवांचा बाजार पसरणार नाही यावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच श्रीगणेश मंडळानी परवानगी घेवूनच श्रीगणेश मुर्तीची स्थापना करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावर्षी दोन्ही धर्मीयाचे सण एकत्र आले आहेत. दोन समाजाने या कालावधीत शांतता व संयम पाळून सण साजरे करावेत. गणपती मंडळानी समाजात तेढ निर्माण होणार नाहीत याची काळजी घेवून देखावे करावेत. तसेच ध्वनी प्रदुषण मुक्त गणेश उत्सव साजरा करण्यावर भर द्यावा, असे पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले. नागरिकांनी स्वतः होवून नियम पाळले तर शांततेचा भंग होणार नाही. प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखून सण आनंदाने साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यात एक गाव एक गणवती या संकल्पनेवर भर द्यावा, एकोपा ठेवून सामाजिक सलोखा ठेवावा, श्रीगणेश मंडळानी विसर्जनाचा मार्ग प्रशासनास कळावावा. सुरक्षितेच्या दृष्टीने गणेश मंडळाच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावण्याच्या सूचनाही पोलीस विभाग वतीने देण्यात आल्या. म.न.पा. वतीने श्रीगणेश उत्सवा दरम्यान करण्यात आलेल्या उपाययोजना बाबत माहिती देण्यात आली. तसेच विसर्जनाच्या दिवशी संकलन केंद्र उभे करण्यात येणार असून नागरिकांनी गणेश मुर्ती संकलन केंद्रातच जमा कराव्यात, पीओपी व प्रतिबंधित मुर्त्यांची स्थापना करू नये म.न.पा. च्या वतीने कळविण्यात आले आहे.
यावेळी गणेश उत्सवात विद्युत पुरवठा नेहमी सुरळीत राहील याची काळजी घेतली जाईल. दहा दिवसासाठी पुरविण्यात येणाऱ्या विद्युत पुरवठ्या विषयी विद्युत विभागाच्या वतीने माहिती दिली. प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहनाची तपासणी नियमा नुसार प्रमाण पत्र निर्गमित केले जाईल. याबाबत पुरविण्यात येणाऱ्या सेवा वेळेत देण्या बाबत माहिती दिली. शांतता समिती च्या सदस्यांनी श्रीगणेश उत्सव व ईद-ए-मिलाद या सणांमध्ये येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्या निवारण्यासाठी संबंधित विभागा तर्फे कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगितले. सण उत्सवाच्या काळात शांतता समितीचे सदस्य व सर्व सामाजिक नेत्यांनी आपापल्या समूहात, गल्लीत, गावात, नगरात शांतता राहील यासाठी स्वतः प्रयत्न करावे. तसेच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन ही यावेळी करण्यात आले.















