16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️प्रस्तावित बस स्थानकास मंजुरी भाजपा गजानन पाटील चव्हाण यांच्या पाठपुराव्यास यश.

🔴 महाव्यवस्थापक बांधकाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ मुंबई श्री.दिनेश महाजन, यांची गजानन पाटील चव्हाण बसस्थानक साठी घेतली भेट तर प्रस्तावास मंजुरी.

♦️नायगावं शहरात लवकरच बसस्थानक ये जा करण्याऱ्या प्रवाशासाठी नायगाव मतदारसंघ नांदेड सह कर्नाटक आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यातील सामान्य नागरिकांसाठी खुशखबर..

शिवगर्जना न्यूज, 

नायगांव प्र. 

दिपक गजभारे

दिनांक ३१ /०७/ २०२४ रोजी महाव्यवस्थापक बांधकाम परिवहन मंडळ मुंबई दिनेश महाजण यांना दिनांक १७/०४/२०२४ रोजी जिल्हा वाहतूक नियंत्रण अधिकारी अर्थात डी.सी. नांदेड यांचे कडून गजानन पाटील चव्हाण यांच्या पाठ पुराव्याने प्रस्ताव पाठवण्यात आला होता तसेच हा प्रस्तावित प्रस्तावव्यास मंजुरी मिळालेली आहे. 

तसेच नायगाव तालुका हा महाराष्ट्र आंध्रप्रदेश व तेलंगणा कर्नाटक येथून व्यापार व बाजार पेठेत येणारे सामान्य नागरिक, शाळा कॉलेज व उच्चं शिक्षणासाठी येणारे विध्यार्थी, वैधकीय दवाखान्यासाठी येणारे वयोवृध ज्येष्ठ सामान्य नागरिक तसेच बँक महसूल तहसीलच्या कामा निमित्ताने ये जा करणाऱ्यां सामान्य शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी नेहमीच त्रासदायक ठरलेल्या महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बस्थानकाची समस्या गंभीर बनलेली असताना नायगावं येथील नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व तथा सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक मा. गजानन पाटील चव्हाण यांच्या मागील अनेक वर्षाच्या प्रयत्नाला अखेर यश मिळाले. आज मुंबई येथे महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक यांची भेट घेऊन मागील अनेक दिवसापासून करण्यात आलेल्या सर्व घडामोडीचा तपशील त्यांच्या समोर सादर केला असता मा महाव्यवस्थपक साहेबांकडून या संदर्भातील कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून हा प्रश्न लगेच संबंधितांना आदेश दिले आहे अर्थात सूचित करण्यात आले यामुळे नायगाव येथे येणाऱ्या हजारो लोकांकरीता सुखद व आनंदाची बातमी आहे. नायगाव शहरातील बस्थानाकाची फाईल झेड संदर्भाच्या स्पीडने काम चालू करण्यात आले आहे तसेच लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाले आहे.

खरं तर नायगावं मतदार संघातील सत्ताधारी नेत्यांनी या भागातील प्रश्नाकडे लक्ष देऊन यापूर्वीच या समस्या सोडवायला हव्या असताना आमच्या प्रतिनिधीशी बोलत असताना एका सामान्य सामाजिक कार्यकर्त्यांनी हे प्रश्न हातावर घेऊन मार्गी लावल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मा. गजानन शंकरराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी येणाऱ्या काळात या भागातील सामान्य जनतेसाठीचं स्वतःला झोकून दिल असल्याचे सांगून भविष्यात या भागातील जनतेच्या मुख्य समस्याकडे लक्ष घालून सर्वांगीण विकास काम करत राहीन व जनेचा व सामान्यांनाचा वापर करून घेणाऱ्या राजकारण्यांना स्वबळावर समस्या सोडवून एक प्रकारे प्रस्थापित राजकारण्याची निष्क्रियत्ताचं सिद्ध केली. आज पर्येंत च्या या भागातील घराणे शाहीच्या व प्रस्थापितांच्या निष्क्रिय व वारसा हक्क राजकारणाला अधिक महत्व न देता आपल्या भागाच्या विकासासाठी शेतकरी शेतमजूर व अठरापगड समाजातील युवकांनी समाजकार्य करण्यासाठी पुढं यावं. या भागात काही ठराविक घराण्या शिवाय कोणालाही संधी मिळवता आली नाहीं. सुरुवातीला आजोबा बाबा त्यांच्या नंतर मुलगा आज त्यांचा कुठे मुलगा तर कुठे सून हेच पहायला मिळेल पण एका सामाजिक कार्यकर्त्याने या भागाचे इतिहास बदलू येणाऱ्या काळात या भागातील शेती सिंचनाचा प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यांना बोगस बियाणे, फवारणी, कृषी विभागातील धोरण व शेतकऱ्यां संदर्भातील घडामोडीचे विषय व 

ग्रामीण भागातील प्रश्नावर प्रशासकीय कर्मचाऱ्यांची मनमानी व मुजोरी या बाबद तसेच शेतकरी बांधवावर करणाऱ्या पीक विमा व अनुदानात बँकेकडून होणारा त्रास या सर्व प्रश्नावर लक्ष घालून हे सर्व समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिका बोलून दाखवली. तेंव्हा भागातील जनते मधून आपला माणूस असा सूर निघताना दिसत आहे. स्वतःचा कोणताही गाजावाजा न करता या भागातील जनतेच्या प्रश्नावर झुंजणारे नेतृत्व गजानन पाटील चव्हाण म्हणून जनतेतून त्यांच्याकडे पाहिलं जाते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या